नाशिक शहरातील UPSC परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला.
