• यावल तालुक्यात 48 ग्रामपंचायतींचा प्रश्न
  • प्रशासकांची मुदत 31 ऑगस्टला संपली
  • ग्रामपंचायतींचा कारभार आता कोणाकडे?
  • ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडे कारभार जाणार?
  • निवडणुका लांबणीवर पडल्याने विकासकामे रखडली
  • शासनाच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष

JALGAON | यावल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणाकडे जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
यावल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींची मुदत सुमारे सहा महिन्यांपूर्वी संपली होती. त्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या प्रशासकांची मुदतही ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे.

आता ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा मानस असल्याची चर्चा आहे. मात्र, शासन याबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे विकासकामांमध्ये खोळंबा झाल्याचे सांगितले जात आहे. शासनाकडून कोणते आदेश येतात आणि पुन्हा कोणाची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *