अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या अनियोजीत कार्य वाहनचालकांच्या जिवावर…
गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.-6 वर साकोली ते शिरपुर/बांध या महामार्गावरील पुलाचे बांधकाम अग्रवाल ग्लोबल कंपनी तर्फे मागील दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, रस्ता पूर्णतः खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत असल्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे महामार्गावर असलेल्या ग्रामस्थांचे आराेग्यही धाेक्यात आले आहे. तर शेकडोंचे अपघातात म्रुत्यु झाले आहे.

सध्या वातावरणात गारठा वाढल्यामुळे आर्द्रता वाढीस लागली आहे. परिणामी या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासह मोठ्या वाहनांची असणारी वर्दळ त्यामधून निर्माण होणारी धूळ ही घातक सिद्ध होत आहे. प्रशस्त प्रमाणात या महामार्गावरील पुलाच्या निर्माण कामात मोठ्या वाहनांचा वापर होत आहे. मुरूम, खडी सातत्याने आणण्यासाठी असंख्य व ओव्हरलोड टिप्पर या ठिकाणी भरधाव प्रवास करत आहेत. मात्र यामधून धुळीचे निर्माण होणारे लोट इतर वाहनधारकांच्या जिवावर उठले आहेत. मुळात रस्ता खोदलेल्या ठिकाणी मुरूम भरणा करण्यात आला आहे. परंतु त्यावर सातत्याने पाणी टाकणे आवश्यक असताना संबधित अग्रवाल ग्लोबल कंपनी याकडे पध्दतशीरपणे डोळेझाक करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वातावरणात उठणारी धूळ तासन्तास खाली येत नाही, त्यात वाहनांची सातत्याने होणारी वाहतूक या मार्गावर मातीची पावडर नागरिकांवर फवारत आहे.

सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते देवरी तालुक्यातील शिरपुर/बांध महामार्गावरील रत्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असुन , या मार्गावर धुळीचे लोट पसरलेल्या अवस्थेत राहत असल्याने या मार्गावरून वाहतूक करण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित अग्रवाल ग्लोबल कंपनीकडे आजवर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी वर्गाने पाहणी का केली नसुन सूचना केल्या नसल्याचे चित्र आहे. अजून साधारण दोन वर्ष या मार्गाचे बांधकाम सुरू राहणार आहे, त्या प्रमाणात संबंधीतअधिकारी वर्गाचे या बांधकामावर लक्ष दिसत नाही. तातडीने या मार्गावर होणाऱ्या बाधंकामाची पाहणी करून उपाययाेजना करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
प्रतिक्रीया
कोहमारा ते शिरपुर/बांध महामार्गावरील पुलाचा बांधकाम मागील दोन वर्षापासुन सुरू आहे. त्यामुळे सातत्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या बांधकामामुळे वाहन चालकानां ऐकेरी रस्ताच उपलब्ध आहे. त्यातही त्या महामार्गावर अग्रवाल कंपनीचे मोठ-मोठे ओव्हरलोड व अनाधिक्रुत रेतीचे व मुरुमाचे ठिप्पर सुरू आहेत. सोबत पुल बांधकामाकरीता राखेचे मोठमोठे ढिगारे टाकन्यात आले आहेत. सतत या कंपनीच्या निष्काळजीपनाच्या व संबधीत विभागाच्या चालढकल पना मुळे अजुन किती नागरीकांना या पुलाच्या बांधकामात जिव द्यावे लागनार आहेत. संबधित कंपनीने व समबधित विभागाने तातडीने जर याकडे लक्ष दिले नाही तर राष्ट्रवादी स्टाईलने समाचार घेण्यात येईल.
सी.के. बिसेन (ता.अध्यक्ष राकांपा)