लहरी व मर्जीने चालतो कारभार, जबाबदारीची उणीव

नागपूर । अनिकेत उमरेडकर

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील फेटरी गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून, दवाखाना सुरू आहे की बंद, याचा नेमच उरलेला नाही. मुख्य रस्त्यावर वसलेला हा दवाखाना बाहेरून पाहिल्यास सुरू असल्याचा भास निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्षात तो नेहमीच कुलूपबंद असतो.

गावातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. दवाखान्यात डॉक्टर आहेत की नाही, याचीही स्पष्टता नाही. त्यामुळे अपघात किंवा आजारपणात नागरिकांना कळमेश्वर किंवा नागपूर गाठावे लागते, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दवाखान्याच्या परिसरातील नागरिकांनीही सांगितले की, कधी उघडतो तर कधी बंद असतो, त्यामुळे तो आहे की

आयुष्मान आरोग्य मंदीर

आरोग्य उपकेंद्र, फेटरी

नाही, हेच समजत नाही. जर उपयोगात नसणार असेल, तर तो बंद करून टाकावा.

या संदर्भात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कळमेश्वर तालुकाप्रमुख यांनी दहा वेळा या दवाखान्याला भेट दिली असून, त्यांनीही याठिकाणी होणाऱ्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. दादा, याचा काही भरोसा नाही, कधी उघडतो, कधी बंद, काही

सांगता येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेही या विषयात दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या मते, जर दवाखाना सुरू ठेवायचा नसेल, तर तो अधिकृतपणे बंद करून इतर उपाययोजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *