नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटने संबंधातील माहिती देण्यासाठी बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ ला देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पाईंट मुंबई येथे भेट घेतली. यावेळी पक्षसंघनेच्या जिल्ह्यातील वर्तमान स्थिती बाबत मा. पवार साहेबांशी चर्चा केली.


मंत्रालयाशी संबंधित कामे असल्यास मुंबईला जावे लागते. सामान्य मानसाला वारंवार मुंबईला जाणे शक्य होत नाही. त्याकरीता मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर नागपुरात मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही एक कक्ष स्थापण करुन जिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तिला तीथे बसवावे अशी मागणी मा. पवार साहेबांकडे केली. त्यावर लवकरच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे पवार साहेबांनी सांगितले. पक्षाचे नेते व माझी गृहमंत्री श्री. अनिलबाबु देशमुख यांच्यामागे भाजपने ईडी, सीबीआईचा ससेमिरा लावला आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत निराशा दिसुन येत आहे. ती घालवून कार्यकर्त्यांना मानसिक बळ देण्यासाठी जिल्ह्याकरीता संपर्क मंत्री असणे फार गरजेचे झालेले आहे. संपर्क मंत्री नेमल्यास संघटन आणखी बळकटी करण्याला त्याचा बराच फायदा होवू शकतो. हि बाब मा. पवार साहेबांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर लवकरच नागपूर जिल्ह्याकरीता संपर्क मंत्री नेमणार असल्याचे साहेबांनी सांगितले. यासोबतच येत्या काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढविल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना निवडनुकित त्यांची ताकत दाखविण्याची संधी मिळेल व त्याचा पक्षाला मोठा लाभ होईल हि बाब साहेबांच्या निदर्शनास आणुन दिली.नागपूर जिल्ह्यात मा. साहेबांची किमान एक तरी जाहिर सभा व्हावी अशी सर्वच कार्यकर्त्यांची ईच्छा असल्याचे सांगितले असता. कोरोना आपत्तीचा प्रभाव ओसरताच सभा घेणार असल्याचे पवार साहेबांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात पक्ष संघटनेची सुरू असलेली वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगुन याकरीता जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असल्याबद्दल माझे अभिनंदन करुन पुढिल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *