गडचिरोली- चामोर्शी मार्गाची वाहतूक ठप्प

अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त

गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली- चामोर्शी मार्गावर असलेल्या गोविंदपुर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली – चामोर्शी मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या मार्गावरील गोविंदपूर नाल्याच्या रप्ट्याचे नविन फूलाचे बांधकाम सुरू असून या फूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नेहमी उद्धभवनारी समस्या मिटणार आहे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन तिन दिवसापासुन अवकाळी पावसाने हजेरी लावली असून गडचिरोली चामोर्शी मार्गाची वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा व गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. व या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. व या अवकाळी पावसामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.

भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *