गङचिरोली : अहेरी तालुक्यातील आज महाशिवरात्री निमित्त दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे नदीघाटावर जमावबंदीचे आदेश असतानाही अहेरी पासून तीन किलोमीटर अंतरावरील चिंचगुंडी येथील प्राणहीता नदीघाटावर शिवभक्तांची गर्दी जमली होती.
तसेच काही शिवभक्त जवळच्याच चिंचगुंडी येथील नदीघाटावर आंघोळीला गेले. त्यात चेरपल्ली येथील काही तरूण गेले असताना पोहण्याच्या नादात करण कांबळे, वय 19 वर्ष हा वाहून गेल्याची बातमी सोबत हजर असलेल्या तरुणांना कळली.

यासंबंधीची तक्रार वाहून गेलेल्या मृतकाचे काका यांनी पोलीस स्टेशन अहेरी येथे दिली. पोलीस घटना स्थळी पोहोचले असून वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेत आहेत.