नागपुर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील परिसरात काही भागात आठ ते पंधरा दिवसा पासून सतत अवकाळी पाऊस झाला. अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मिरची, कापूस, उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या आठ ते पंधरा दिवसा पासून नागपुर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. आज देखील मौदा तालुक्यात अनेक गावी काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे, पाऊसा मुळे खरीप हंगामतिल नुकशान होत असलेल्या पंचनामे करण्याची मांगनी शेतकऱ्यांनी केली व युवक कॉंग्रेस मित्र परिवार चिरव्हा चे कार्यकर्ता अभिषेक ठवकर यांनी वेक्क्त केले

प्रतिनिधि आनिल डूंभरे मौदा नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *