नगर शहरातील उड्डाणपुलावर चांदणी चौक भागातील धोकादायक वळणावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.


⭕️तीव्र अपघाती वळणाच्या ठिकाणी काँक्रिटच्या संरक्षक भिंतीची शक्य तेवढी उंची वाढविण्यात यावी.
⭕️पुढे अपघात स्थळ व धोकादायक वळण असल्याचे फलक ठळक स्वरूपात लावण्यात यावेत.
⭕️वाहनांचा वेग कमी करण्याच्यादृष्टीने तीव्र वळणाच्या २०० मीटर आधी रम्बलर स्ट्रीप लावण्यात याव्यात.
⭕️तसेच पूर्ण उड्डाणपुलावर कॅट आईज व ब्लिंकर्स लावण्यात यावेत.
⭕️त्याचबरोबर वारंवार होणारे अपघात रोखण्याच्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.


अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे पत्राद्वारे केल्या आहेत. या अपघातांबाबत अभय ललवाणी यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ई- मेलद्वारे पत्र पाठवून लक्ष वेधले होते.