♦️सर्वात मोठ्या भारतीय प्रशासकीय सेवेचा राजिनामा देणारे वैभव वाघमारे
♦️कर्तव्यनिष्ठता जोपासणार्या जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पाठीशी वाशीमकर
फुलचंद भगत
वाशिम:-आपल्या पदाचा दुरुपयोग करुन हुकुनशाही पध्दतीने प्रशासकीय कामकाज करत असल्याचा आरोप काही कर्मचारी संघटनांनी करत वाशिम जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीसाठी बंड पुकारलेले असतांनाच दुसरीकडेही ‘वुई सपोर्ट सिईओ’ असा नारा देत जिल्ह्यात बर्याच सामाजिक,राजकीय पञकार,पदाधिकारी संघटनांची सिईओ वैभव वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे राहत बदली न करण्याची मागणी करत कर्तव्यदक्ष अधिकार्यासाठी बदली न व्हावी यासाठी प्रसंगी रस्त्यावर ऊतरण्याची सर्वतोपरी तयारी केलेली दिसते त्यामुळे वाशिम जिल्ह्यात आता सिईओ वाघमारे प्रकरणावरुन ‘कोल्ड वार’ सुरु झालेले आहे.
♦️पदाचा दुरुपयोग करुन हुकुमशाही पध्दतीने कामकाज करुन अधिकारी कर्मचार्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप सिईओ वैभव वाघमारे यांचेवर होत आहे पण सर्वात मोठ्या भारतीय प्रशासकीय नोकरीचा (आयएएस) राजीनामा देणारे वैभव वाघमारे खरच हुकुमशहा असतील का?प्रसिध्दीसाठी काम करीत असतील का? याचाही विचार सुज्ञ करत आहेत.प्रशासनातील ‘सिंघम’ भुमिका बजावणारे वाघमारे हे कामचुकार व वेळकाढुपणे नोकरी करुन पगार लाटणार्या अधिकारी कर्मचार्यांना नक्कीच ञासदायक ठरतीलच हे माञ नक्कीच!ज्या कर्मचारी संघटनांनी सिईओ च्या विरुध्द बदलीसाठी तक्रारी दिल्या त्या संघटनातील सर्वच पदाधिकार्यांचा बदलीसाठी पाठींबा आहे की फक्त संघटनेचे म्होरकेच आव आनत आहेत हे ही पाहणे औसुक्याचे ठरेल.

♦️मिळालेल्या माहीतीनुसार बर्याच कर्मचारी संघटनांना सिईओ च्या बदलीसाठी तक्रार करावयाची आहे याची भनकही नाही मग कुणाच्या इशार्याने हे बदली मागणी छडयंञ चालवल्या जात आहे याचाही सुज्ञ नागरीकांनी शोध घेणे आता गरजेचे आहे.आकांक्षित जिल्ह्याला अशाप्रकारे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळने भाग्याची गोष्ट असतांना जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘सिंघम-२’ पिच्चर सुरु झाला आहे.कारण याआधीही अशाच ऐका कर्तव्यदक्ष अधिकार्याच्या बदलीसाठी मागणी लावुन धरलेली होती. कर्तव्यदक्ष सी.ई.ओ.वैभव वाघमारे यांची बदली करण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी विविध सामाजीक संघटनासह पञकार बांधवांच्यावतीने जिल्हाधिकारी, वाशिम यांना तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिल्हा परिषद वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वैभव वाघमारे हे रुजू झाले आणि अल्पावधीतच लोकाभिमूख आणि पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांवर छाप पाडली.
♦️मुळात वाशिम जिल्हा हा राज्यातील जिल्ह्यांच्या यादीत आकांक्षित असलेला जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथे आय ए एस दर्जाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अपवादानेच लाभले आहेत. आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभले आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार वैभव वाघमारे यांनी योग्य प्रकारे हाताळल्यामुळे गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अमुलाग्र बदल घडून आले आहेत.चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे ते कौतुक करत आहेत. तर कामचुकारांना वठणीवर आणत आहेत. त्यांच्या या कामगिरीवर जिल्ह्यातील समस्त जनता समाधानी असतांना काही कर्मचारी संघटनांनी वैभव वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली. यामुळे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी कशी काय होऊ शकते? हा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला.
♦️ जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी तसेच गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार विनिमय करून वाघमारे साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांची बदली होऊ नये. वैभव वाघमारे यांची कुठल्याही परिस्थितीत वाशिम येथुन बदली करू नये. जनभावनेचा आदर न करता त्यांची बदली केली गेल्यास सर्व जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.विविध सामाजीक संघटना तसेच पञकार संघटनांनीही सिईओ साहेबांची बदली न करण्यासाठी पुढाकार घेवून मागणी केली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206