- महसूलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती.
- आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी शिबिरासाठी घेतला पुढाकार.
(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय, सावनेर येथे काल दिनांक 11 मे ला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात शासन स्तरावर जनतेच्या समस्या ऐकल्यावर त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

राज्याचे महसूलमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जनतेने डॉ आशिष देशमुख दिलेलं एक मत हे सावनेरच्या विकासाला दिलेले मत आहे. तुम्ही केलेले जबरदस्त परिवर्तन हे सावनेरचा विकास झपाट्याने करत आहे. पांदण रस्ते मजबूत करू. जिल्हातुन 225 करोड निधी सावनेरला देत आहे. बाकी निधी वेगळा आहे. खापरखेडा नहर अतिक्रमण प्रश्न निकाली काढू. आता घर बांधण्यासाठी रेतीची रॉयल्टी तहसील मार्फत घरी येईल, असे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना 3 महिन्याचा आत पट्टे वाटप निकाली काढा, असे आदेश दिले.
या सरकारचे महाराष्ट्र राज्यातील पहिले समाधान शिबीर सावनेरमध्ये घेण्यात आले आहे. श्री बावनकुळे साहेब सर्वसामान्य परिस्थितीतून आल्याने त्यांना गरीब, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. ते या क्षेत्रातील महसूल खात्यातील सर्व कामे निकाली लावतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देतील. वेकोलिच्या आंदोलनाला न्याय मिळून देतील. आमदार झाल्यापासून आपण परिसरातील अवैध धंदे बंद करत आहे. मोहपा, खापरखेडा येथे नवीन पोलीस स्टेशन अस्तित्वात येत आहे. लोकांना न्याय देणे आणि सावनेरला बेरोजगारीतून बाहेर काढणे, याला आपले प्राधान्य राहणार आहे. सर्व लोकांनी सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी यावेळी म्हटले. वन विभागच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की, शेतकऱ्यांना कोणत्याही वन्य प्राण्यांकडून त्रास व्हायला नको.
सामान्य जनतेचा महसूल विभागाशी दैनंदिन जीवनात संबंध येतो. या शिबिरात जनतेच्या हितासाठी एकूण 20 शासकीय विभागांच्या सहभागाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये मुख्यतः कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय, रोजगार, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास अशा विषयांचा समावेश आहे. या उपक्रमामधून नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती, अर्ज स्वीकृती, तक्रार निवारण, मोफत आरोग्य तपासणी, कृषी मार्गदर्शन, महिला बचतगट नोंदणी अशा अनेक सेवा देण्यात आल्या.
सर्वप्रथम श्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सर्व स्टॉलवर भेट दिली तसेच सर्व अधिकाऱ्यांजवळून सर्व विभागांचा आढावा व माहिती घेतली.

शिबिराला परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. लोकांचे शासकीय यंत्रणेवरचे विश्वास पुनर्स्थापित करणारे व जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लावणारे असे हे शिबीर ठरले. लाभार्थ्यांना लाभाचे वाटप व प्रमाणपत्र वितरण ज्यावेळी करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी डॉ. राजीव पोतदार, श्री. अशोकराव धोटे, श्री. मनोहरजी कुंभारे, श्री. प्रकाशजी टेकाळे, श्री. देविदासजी बनकर, श्री. अशोकराव तांदुळकर, श्री. प्रमोद हत्ती, पोलीस उपअधीक्षक श्री. अनिल म्हस्के, उपविभागीय अधिकारी श्री. संपतराव खलाटे, तहसीलदार श्री. रवींद्र होळी आणि श्री. रोशन मकवाणे यांचीही उपस्थिती होती.