NAVI MUMBAI | हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. याच संदर्भात ऐरोली मध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरवर शोले चित्रपटातील “कितने आदमी थे, सरदार दो… और तुम तीन.. फिर भी वापस लोट आये“ या फेमस डायलॉग चा उल्लेख करण्यात आला असून वरती राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. सदरचा बॅनर मनसे च्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला असून जणू काही जय आणि वीरू ची जोडी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी पुन्हा एकत्रित लढणार असल्याचा संकेत देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *