गडचिरोली : राज्यातील महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार आटोक्यात यावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ हा कठोर कायदा काल विधानसभेत एकमताने मंजूर केला आहे. त्याबद्दल काल आलापल्ली येथे राष्ट्रवादीचे महिला नेतृत्व तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथे रॅली काढून महाविकास आघाडी सरकारचे हार्दिक अभिनंदन केले.

या कठोर अश्या शक्ती कायद्यामुळे महाराष्ट्रातील महिला आणि बालके अधिक सुरक्षित राहतील. अशा आश्या बाळगत आलापल्ली येथील सर्व महिला भगिनींना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन काल या कायद्याचे अंमलबजावणी कशाप्रकारे होणार याची माहिती दिले .या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीनभाभी हकीम ,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपलीवार ,माजी नगरसेविका ममता पटवर्धन ,अर्चना वीरगोनवार वनिता आईंचवार ,जयश्री चीलवेलवार ,आरती डुकरे ,मंगला गोबडे , साक्षी मल्लेलवार, सुचिता खोब्रागडे ,आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार ,माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोने तसेच विशेष उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार आधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *