आष्टी-ईलूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार यांची मागणी
गडचिरोली : सन २०२१ ते २२ मध्ये शेतकऱ्यांच्या धानाला सरसकट प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव व एक हजार रुपये बोनस द्यावा , अशी मागणी आष्टी ईल्लूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

धान शेतीसाठी अतोनात खर्च करावे लागतो . त्यात शेतीची मशागत करणे , पन्हे टाकणे , काढणे , रोवणीसाठी चिखल करणे , रोवणी करणे , धानावर लागणारा औषधीचा व फवारणीचा खर्च , धानाचे चांगले उत्पादनासाठी खते , निंदणाचा खर्च , धान कापणे , कापून त्याला बांधून जमा करणे व मळणी करून घरी धान आणण्यापर्यंत एकरी सविस हजार ६७५ रुपये एवढा खर्च येत असतो . मात्र , उत्पन्न केवळ एकवीस हजार रुपये इतकेच आहे . शासनाच्या हमीभावानुसार प्रतिएकर पाच हजार ६७५ रुपये तोटा होत आहे . त्यामुळे शेतकरी जगणार तरी कसा ? शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार आहे . शासनाने या सर्व बाबींचे सर्व्हे करून धानाला सरसकट तीन हजार रुपये भाव द्यावा , अथवा हमीभावावर एक हजार रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांचेकडून केली जात आहे .
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली