मी तर पडणारच पण सोबत तुलाही पाडणार..!

उमरगा शहरातील पालक करतात आपल्या पाल्यावर लाडाची अतीवृष्टी.?

सचिन बिद्री-उमरगा,उस्मानाबाद

सुंदर अक्षर हा विद्यार्थ्यांचा खरा दागिना असतो हे सुविचार पूर्वी प्रत्येक शाळेत विद्यार्थी पाटीवर गिरवायचे पण काळ बदलत गेला आता शाळेतील-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षर ऐवजी,तुझ्या स्कुटी पेक्षा माझी बुलेट भारी.. तर कुठे तुझ्या बुलेट पेक्षा माझी ही चार चाकी कार भारी अशी स्पर्धा सर्रास पहावयास भेटत आहे.यामागे केवळ विद्यार्थ्यांचीच चूक नसून पालकांची चूक असल्याचे सुसंस्कृत पालकांतुन प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर्ती भाग असल्याने दोन्ही राज्यातील आसपास च्या गावातुन मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उमरगा शहरात शिक्षण घेण्याहेतु येतात.. शहरात आदर्श महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय असे दोन महाविद्यालय असून जिज्ञासू वृत्तीचे पाल्य शिक्षणरुपी अमृत चाखून आपले ध्येय गाठत आपल्या आई-वडील व शिक्षकांचे आदर्श पाल्य ठरतात पण बरेच असे पालकही अलीकडे आढळून येत आहेत की जे आपल्या पाल्यांच्या शैक्षणीक वृद्धी तथा पाल्याच्या दिवसभरातील घडामोडीवर लक्ष न देता,जे हवं ते देण्यात..लाड पुरविण्यात आपली जबाबदारी संपली या भ्रमात असल्याचे दिसून येत आहेत.
शहरातील महाविद्यालयात अगदी अकरावी-बारावी चे विद्यार्थी कॉलेज ला चारचाकी वाहन आणून आपल्या सवंगडीला(क्लासमेंट्स-बॅचमेंट्सना) आपल्या घराच्या श्रीमंती तथा शक्तिप्रदर्शन करतानाचे चित्र हमखास दिसून येते. पालक या लहानग्या पाल्याना महागड्या कार का बरं देत असतील..?महाविद्यालयात ते शिक्षण गृहण करायला आले की पिकनिक ला आले..?हे उमगतचं नाही..! अश्या बाबींमुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर ही नक्कीच परिणाम होत आहे. काहींना आपल्याकडे साधी सायकल नसल्याचे हीन भावना निर्माण होते त्यामुळे खऱ्या अर्थाने निदान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत पालकांनी आपल्या लहान लहान पाल्यांना महागड्या चार चाकी वाहन देणे हे सामाजिक संतुलन बिघडविण्यास खत-पाणी घातले जात असल्याचे काही पालकांतून वर्तविले जात आहे.एवढेच काय तर उमरगा शहरातील काही इंग्रजी माध्यम च्या शाळांमध्ये नववी आणि दहावी चे काही मोजके विद्यार्थी दुचाकी वाहने घेऊन येजा करताना सर्रास आढळून येतात त्यात काहीजण महागडे बुलेट ची सवारी करीत आढळून येतात. कायद्याने अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर वाहन चालक चा परवाना भेटतो तेंव्हा एखादी दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालविण्यास परवानगी असते पण उमरगा शहरात अगदी आठवी-नववी चे विद्यार्थी बुलेट सारख्या दुचाकीवर आपल्या दोन तीन मित्रांना सोबत बसवून “धूम” सिनेस्टाईल धूर उडवताना दिसून येत आहेत.यांना जणू कोणाचीही भीती नाही… ना पालकांची ना पोलीसांची.!
अश्या लहान लहान मुलांना महागडे दुचाकी वाहने देणे त्या संबंधित पालकांना कदाचित आपला मोठेपणा वाटत असेल..!पण यामुळे ते आपल्याच पाल्याचा घात करत आहेत याची जाणीव संबंधित पालकांना लवकर होणे अपेक्षित आहे. कारण ते एकटे कधीच राईड करत नसतात तर आपल्या मित्रांना गाडीवर बसवतात व रोड इतर वाहनांना पण यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे. प्रौढ व्यक्ती नियमाने जरी वाहन चालवत असेल तर अश्या लहान मुले नियमांना धारेवर ठेवत दुचाकी फरफटत नेतात की त्यांच्या मुळे इतरांना नकळत त्रास होतो तर कधी कधी लहान मोठ्या अपघातांचा सामना करावा लागतो.
उमरगा शहरातच का आहे मुभा लहान मुलांना गाडी चालवायची..?

उमरगा शहरात श्रीमंत लोकांची संख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा अधिक असल्याने इथे पालक आपल्या पाल्यांना लवकर महागड्या दुचाकी अगदी शाळेपासूनच देताना दिसून येतात. तर ट्राफिक पोलिसांची संख्या नगण्य असल्याने, आपणाला कोणी ट्राफिक पोलीस पकडेल? ही भीती विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही.

याचे परिणाम काय होणार..?

अती लाड पुरविल्याने पाल्यांमध्ये पैश्याची किंमत राहणार नाही,त्यामुळे वाममार्गाला लागण्याची दाट शक्यता असते त्यामुळे वेळीच पालकांनी आपल्या पाल्यांवर संस्कारचे बीजारोपण करणे आवश्यक आहे ना की लाड पुरवीत महागड्या गाड्या-मोबाईल पुरवणे.
अश्या मुलांच्या संगतीत राहून इतर मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिमाण व्हायला वेळ लागत नाही. तर त्यांच्यासारख्या चैनी करण्याच्या नादात गुन्हेगारी प्रवृती कडे वळू शकतात. तर संबंधित शाळा किंवा महाविद्यालयातील मुलींना असुरक्षितेचा आभास होतो आणि मुलींच्या पालकांचा कल बालविवाहाकडे वळन्यास कारणीभूत ठरतात.

प्रत्यक्षात,काय आहे वाहतुकीचा नवा नियम..?

१)विना लायसन्स वाहन चालवताना आढळून आल्यास रुपये पाच हजार दंड आकारण्याचा नियम लागू आहे.

२)लायसन्स असताना ट्रिपल सिट वाहन चालवताना आढळून आल्यास एक हजार रुपये दंड.

३)वाहन चालवताना मोबाईल चा वापर करताना आढळल्यास पाचशे रुपये दंड

४)विना हेल्मेट, रोंग साईड आणि मद्यपान करून असे विविध नियम लागू आहेत पण नियमांची अंमलबजावणी करणारे प्रशासन सुस्त असेल तर नियमांना केराची टोपली दाखवत सर्रास वाहन चालक उमरगा शहरात आढळून येत आहेत.

ट्राफिक पोलीसांची जबादारी..?

शहरात मुख्य काही चौकात गस्त करीत विशेष शाळा सुटण्याच्या दुपारी 1 ते2 च्या दरम्यान प्रत्येक वाहन चालकाचा लायसन्स चेक करावा,ज्यांचे वय अठरा(18) वर्षे पेक्षा कमी आहे अश्या विद्यार्थ्यांचे वाहन जप्त करून पालकांकडून योग्य ती दंडात्मक कार्यवाही व्हावी. यामुळे शालेय विद्यार्थी केवळ शिक्षणाकडे आपल्या प्रगतीकडे लक्ष देतील ना की सिने स्टाईल फॅशन कडे..!

—–//—–

“शहरातील ट्राफिक सुरळीत ठेवन्याहेतु विना लायसन्स वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबविली जाणार आहे,लहान मुलांचे वाहन जप्त करून पालकांवर दंडात्मक कारवाइ करण्यात येणार आहे”.— इकबाल सय्यद,पोलिस निरीक्षक, उमरगा पोलीस ठाणे

——-//—–

“लॉकडाऊन नंतर बऱ्याच पालकांचे व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठीची व्यस्तता बऱ्याच शालेय आणि महाविद्यालयीन अल्पवयीन मुलांना पात्रता नसतानाही वाहन चालविणे मजबुरी बनली आहे. अल्पवयीन मुला- मुलींच्या हाती महागडे फोनही आले आहेत, ज्याचा योग्य वापर होत नाही. पालकांनी यात वेळीच लक्ष नाही घातले तर परिस्तिथी हाताबाहेर जाईल”.- प्रा.डॉ.धनाजी थोरे, उपप्राचार्य,श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *