
पुणे : वेळ आमावस्या ही मुळ कर्नाटकाच्या सीमावर्ती भागासह महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.

या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घर परिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो व वलगे वलगे चालेन पलघे या घोष वाक्यने पूजा पूर्ण करून बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात. पुणे येथील आमचे मित्र श्री दिनेश बोराडे सर यांच्या किवळे येथील शेतामध्ये वेळ अमावास्या साजरी करण्यात आली यावेळी श्री विजय संतान, उपसंचालक क्रीडा श्री,जयकुमार टेभरे, डॉ.संदीप चौधरी, श्री भाऊसाहेब भंडारे संपूर्ण कुटुंबासह साजरी करण्यात आली, मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात असे कार्यक्रम म्हणजे वन भोजन समजले जातात. विशेष म्हणजे लातूर पध्दतीने बनविलेले पदार्थ भज्जी, रोडगा, आंबील, भरीत शेतामध्ये कोप करून पांडव पूजन व नेवेद्य अश्या प्रकारे साजरी करण्यात आली.