विलास साखर कारखाना युनिट-२ ला “ऊस विकास योजनेअंतर्गत” राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर.

लातुर : हाळी हंडरगुळी जवळ असलेल्या ता.उदगीर मधील आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे या शिखर संस्थेकडून ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार जाहीर करण्यात आले.त्यामध्ये विलास सहकारी साखर कारखाना लि.युनिट २ ला ऊस विकास योजनेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांना हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्या बद्दल कार्यक्षेत्रातील दोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पुरस्कार जाहीर झाले आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेअंतर्गत सहभाग घेतला होता.गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्या बद्दल सुनील संग्राम कुंठे रा.आनंदवाडी ता.उदगीर येथील उत्पादक शेतकरी यांनी कोसी-६७१ या जातीच्या ऊसाचे एक हेक्टर मध्ये २५५.४२ में.टन.उत्पादन घेतले असल्याने त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.सदर पुरस्कार हा योग्य नियोजन,खत,पाणी, व्यवस्थापन इत्यादी बाबत कारखान्याचे शेतकरी अधिकारी , ऊस विकास अधिकारी यांनी पुर्व मशागत पासुन ते ऊस गाळपास जाईपर्यंत केलेल्या पूर्ण मार्गदर्शन केल्यामुळे पुरस्कार प्राप्त झाल्याचे कार्यकारी संचालक एस.आर.पवार यांनी सांगितले तसेच कारखान्याचे संस्थापक राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख तसेच व्हाईसचेअरमन रविंद्र काळे यांनी सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

लक्ष्मीकांत मोरे
उदगीर, जळकोट प्रतिनिधी लातुर
एन.टिव्ही.न्युज मराठी
दि.०७/०१/२०२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *