ब्रह्माकुमारीज युवा विंग चा कार्यक्रम
वाशिम : स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी,प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सारंगधर नवलकर, भगवान देवकर,वेटलिफ्टर कौसर भाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पोलीस निरीक्षक नवलकर यांनी युवकांना आपल्या कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव करून दिली युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी अध्यात्मिक उन्नती करावी ब्रह्माकुमारी विद्यालय आत्मिक उन्नती व मनःशांती करिता प्रभावी केंद्र आहे मनुष्य आत्म्याला परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी आवश्यक राजयोगाचे ज्ञान ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रातून निरंतर दिल्या जात आहे. प्रत्येक मनुष्य ही ईश्वराची श्रेष्ठ रचना आहे ही स्मृती सदैव ठेवून प्रत्येकाने श्रेष्ठ कर्म करावे समाजाच्या देशाच्या व आपल्या परिवाराची सेवा करून युवकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करावे असा आशावाद नवलकर यांनी केला ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात आल्याबरोबर मनःशांती ची अनुभूती झाली कार्यक्रमाला येऊन युवकांशी संवाद साधता आल्याबद्दल त्यांनी दिदींना विशेष धन्यवाद दिले.भगवान देवकर यांनी युवकांना स्वतःसाठी सकाळच्या वेळी वेळ काढून आपण ठरविलेल्या ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी अथक व निरंतर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेख कौसर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलता निर्माण करून संधी ओळखून संधीचे सोन करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास जोपासण्याचा सल्ला दिला.
ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन करून आजकाल भरकटत चाललेली , दिशाहीन झालेली व तणावाच्या गर्द काळोखात अडकलेली तरुणाई ही सुज्ञ व सुसंस्कारित समाजासाठी अतिशय चिंतेची बाब आहे परंतु यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी ब्रह्माकुमारीज ची युवा विंग सातत्याने विविध उपक्रम राबवून युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.युवकांनी नैराश्यतेवर मात करून आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून जननी व जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. दीदींनी मेडिटेशन करण्याचे प्रात्यक्षिक युवकांना करून दाखविले. ब्रह्माकुमारीज संस्थेचा परिचय ब्रह्माकुमारी वंदना दीदींनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी गीता दीदींनी केले तर बि के प्रा विजय डाखोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या ज्ञानार्थिनी विशेष परिश्रम घेतले.