गडचिरोली : सिरोंचा तालुक्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेजुरपल्ली गावात व सोबतच्या परिसरात स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांपासून आजची नेटवर्क पासून गाव व परिसरातील गावे वंचित असल्याचे दिसुन येत आहे आजची नेटवर्क साठी एका चिचेंचा झाडाखाली बसुन सर्चिंग करून संपर्क करावे लागत आहे. तरी देखील संबंधित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन गावातील नागरिकांचे समस्या दूर करण्यात यावे असे परिसरातील नागरिक मागणी करत आहे

शेजारच्या .उमानुर मध्ये असलेले मोबाईल टॉवर कोसो लांभ आहेत त्यामुळे बेजुरपली परिसरात कव्हरेज मिळत नाही. कव्हरेज मिळाली तरी त्या चिचाचा झाडाखाली एक पाईंट पकडते व कमी दर्जाचा कव्हरेज मुळे फोन लागत नाही आणि इंटरनेट तर कुचकामी ठरत आहे.
एकीकडे शासनाकडून विविध योजना इंटरनेट चा माध्यमाद्वारे प्रसिद्ध होत असून या भागातील जनतेला मात्र वेळेवर माहिती मिळत नाही याची फटकाही सहन करावा लागत आहे.. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळा महाविद्यालय आदी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत आहेत मात्र परिसरात एक ही मोबाईल टॉवर नसल्याने विद्यार्थांचे शैकषणिकदृष्ट्या नुकसान होते आहे, याकडे विशेष लक्ष देण्याचे गरज आहे

३ व ४ जी नेटवर्कचा अभाव

सद्या स्थितीत जिल्हातील अनेक ठिकाणी ३ आणि ४ जीच्या स्पीडने ३ नेटवर्क असतो मात्र इथे कोणताही नेटवर्क टावर नाही या गावामध्ये 15 किमी अंतरावरून नेटवर्क उमानुर गावातुन येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर ४ जी नेटवर्क सुरू करण्यात यावे म्हणून नागरीकांकडून मागणी होत आहे. ✒️रवि बारसागांडी एन टिव्ही न्यूज मराठी✒️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *