गडचिरोली : अहेरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहेरी विधानसभेत ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जात आहे या ग्रामीण भागात अजूनही विविध समस्या आवासून आहेत मात्र त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष जनतेला भेटल्याशिवाय पर्याय नाही या करीता ‘आमदार आपल्या भेटीला’ हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. व याच उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याचे आश्वासन अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

बोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ३ फेब्रुवारी रोजी ‘आमदार आपल्या भेटीला’ या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमात कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या १० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी २० हजार रुपये प्रमाणे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच १२ सातबारा तसेच अनुसूचित जमाती व भटक्या जमातीच्या नागरीकांना जातीचे दाखले सुद्धा वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम नायब तहसीलदार दिनकर खोत, बोरी ग्रामपंचायत चे सरपंच शंकर कोडापे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार अहेरी राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडालार व आरोग्य विभाग ,कृषी विभाग,वन विभाग, महसूल विभाग, विद्युतवितरण विभाग, पंचायत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आदिवासी विकास महामंडळ विभाग असे अनेक विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच बोरी व राजपूर पँच ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि बोरी परिसरातील राजपुर पँच, रामपूर, रायपूर, शिवणीपाठ, ओडीगुडम या गावातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.