औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील पोहरी खुर्द व वनगाव येथील आठ ते नऊ शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मका पिकाची लागवड केली आहे, मात्र कणीस येण्याच्या अवस्थेत मका पिक सुकून जळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.शेताकऱ्यांनी बियाणे कंपनीला वारंवार संपर्क केला मात्र सदरील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुठलीच दाद न दिल्याने अखेर शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालक व बियाणे कंपनीची तालुका कृषी कार्यालय व कृषी विभाग पंचायत समितीत दिनांक ४ शुक्रवारी सोयगावला तक्रार देत सांगीतल्यावरुन (दिनांक .५ शनिवारी) घटनास्थळी जायमोक्यावर जावून कृषी कार्यालयाकडून पंचनामा करुन वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे

पोहरी खुर्द येथील शेतकरी नाना परशुराम निकम यांनी आपल्या गट क्रमांक २५ मधील शेतात BREVANT. कंपनीच्या ३०V९२ या वाणाची ३० ऑक्टोंबर रोजी पेरणी केली. तीन महिन्यानंतर या मका पिकाला कणीस येण्याच्या अवस्थेत असतांना सुकून ऊभे पिक जळू लागले. असाच प्रकार उत्तम जंजाळ रा. वनगाव,मनोहर पाटील,नीलेश मगर, सिताराम मगर, राहुल निकम, कैलास निकम, उत्तम मगर,संजय पाटील रा. पोहरी खुर्द अश्या एकूण नऊ शेतकऱ्यांनी लागवड केलेले मका पिक (वाण ३०V९२) कणीस येण्याच्या आतच सुकून जळाले. याबाबत बियाणे खरेदी केलेल्या कृषी केंद्राच्या मालकाशी तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधून वारंवार माहिती देऊनही साधी पाहणी करण्यास कुणीही आले नाही. बोगस बियाण्यामुळे आर्थिक नुकसान सोसूनही सदर शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवून झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले अखेर तालुका कृषी कार्यालय, कृषि विभाग पंचायत समिती, सोयगाव यांचेकडे दिनांक ४ शुक्रवार रोजी तक्रार दाखल करित.रास्त न्याय मागणी केली असता.तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत जायमोक्यावर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करुन वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.या कंपनीविरुद्ध काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *