वाशिम : कारंजा शहरातील नागरिकांना शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानं अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून काही तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा योजनेचे कार्य खोळंबलेले होते. शहरातील पाणी पुरवठा योजनेची समस्या निकाली काढण्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,रांका प्रदेश सचिव श्री बाबारावजी खडसे,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक श्री अशोक भाऊ परळीकर व अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक सोनाली ठाकूर यांनी ८ फेब्रुवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री मा.श्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन समस्या त्वरित निकाली काढण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री मा श्री प्राजक्त तनपुरे यांनी कारंजा शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित अधिकारी, कारंजा नप मुख्याधिकारी व रांका नेते मो युसुफसेठ पुंजानी व श्री दत्तराज डहाके यांचे समक्ष राज्यमंत्री दालनात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या यामुळे कारंजा शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *