लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील गणेश पांडुरंग दापके वय २७ वर्षे हा तरूण मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने १ फेब्रुवारी रोजी पोलिसात ‘मिसींग केस’ दाखल करण्यात आली. सोमवारी ७ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिरू प्रकल्पात सदर तरूणांचे प्रेत आढळून आले. त्याचा पंचनामा व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पण हा खून झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पांडुरंग बाजीराव दापके वय ६५ रा.हंडरगुळी यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी आरोपींविरोधात वाढवणा (बु) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी रोजी गणेश पांडुरंग दापके वय २७ वर्षे हा तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपास चालू असताना फिर्यादीने जबाब दिला की, यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचा मुलगा गणेश दापके याच्यासोबत मागील भांडण्याच्या तक्रारीवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने किडनॅप करून त्याचा खून केला व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत तिरू प्रकल्पाच्या पाण्यात नेऊन टाकले. सदर फिर्यादीवरून विजय शिवाजी हंगरगे, बालाजी शिवाजी हंगरगे, सुभाष गोविंद हंगरगे, संतोष गोविंद हंगरगे, त्र्यंबक दिगंबर घोगरे सर्व रा. हंडरगुळी व विजय हंगरगे याचा साडू बाळू रा. घोणसी ता.जळकोट यांच्या विरोधात मंगळवारी कलम ३०२,३६४,१४३,२०१ भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि नौशाद पठाण हे करत आहेत.
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
मो.नं.९१३०५५३९९७
९०२२४९३४९१