हिंगोली : सध्याच्या घडीला लग्न सोहळे पार पडत असून लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे तर मुलाचे वय 21 वर्ष असे असताना काही ठिकाणी मुलीचे वय कमी असताना सुद्धा लग्न केले जात असून यासाठी हिंगोलीत बाल संरक्षण समिती तर्फे बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथे दिनांक 23 मार्च रोजी होणारा बालविवाह रोखण्यात गोरेगाव पोलीस व बाल संरक्षण समितीला यश आले आहे

हिंगोली जिल्ह्यातील केन्द्रा बुद्रुक येथे एका 17वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती बाल सुरंक्षण समितीला मिळाली होती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, गणेश मोरे, समुपदेशक सचिन पठाडे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे क्षेत्र बाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत यांच्या पथकाने केन्द्रा बु गावात जाऊन भेट देत वधुवरांच्या आईवडीलांना बालविवाह करने कायद्याने बंधनकारक आहे याविषयी माहिती देत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करावा असे आवाहन करत यामुळे हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एक बालविवाह रोखण्यात यश आले आहे.तर गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक पाटील यांनी बाल विवाह करु नये असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *