उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रशस्त असे नाट्यग्रह उभे केले पण त्याची योग्य ती देखभाल करण्यासाठी नगरपालिकेतर्फे उदासीनता दिसून येत आहे. इतक्या वर्षांनी सुद्धा नाट्यग्रहाचे काम अजूनही पूर्णत्वास आले नाही तर बांधकामासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये खर्च झाले असल्याचे अर्चना अंबुरे यांनी एन टी व्ही शी बोलताना आपले मत मांडले आणि फायर फिटिंग साठी ७५ लाख तर एसीसाठी अंदाजे दीड ते दोन कोटी खर्च करण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या आणि बाकीचे इतरही काम अजुन तसेच पेंडींग आहेत.नगरपालिका शहरातुन शहर स्वच्छता अभियानासाठी गाड्या फिरवत आहेत आणि स्वतःच्याच अंगणात मात्र स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. म्हणजे घराची अवस्था अंगण दाखवते याप्रमाणे शहर स्वच्छता अभियान म्हणजे नगरपालिकेचा निव्वळ दिखावापणा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नाट्यग्रहाच्या या वास्तूवर मोठ मोठी झाडे-झुडपे उगवून आली आहेत. याचाच अर्थ असा की नाट्यगृहातील नाटके पहायच्या ऐवजी नागरिकांना नगरपालिका लोकप्रतिनिधींचीच नाटके आणि कामांच्या बाबतीत ढोंगीपणा पहायची वेळ आली आहे. निवेदने तरी कशाकशाची द्यावी हा फार मोठा प्रश्न आता नागरिकांना पडु लागला आहे आणि त्यासाठीच भाजपच्या कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे यांनी इतर काही महिला सोबत घेवुन नाट्यग्रहाच्या वास्तूवर वाढलेल्या झाडांची हार व ओवाळून पुजा केली आणि आगळावेगळा निषेध नोंदवला.

या अनोख्या आंदोलनाला बघुन तरी नगराध्यक्ष यांना जाग येईल आणि जर असे नाही झाले तर असंख्य महिला सोबत घेवुन नाट्यग्रहाच्या आवारात एक मोठे होम हवन यज्ञ करु असा इशारा भाजपच्या अर्चनाताई अंबुरे यांनी दिला आहे.तत्याप्रसंगी सविता सातपुते, संगिता आडसूळ, शितल सातपुते,जना चव्हाण, लता आडसूळ, प्रियांका आडसूळ,आदी महिला उपस्थित होत्या.