लातूर : शिक्षक सहकार संघटनेचे शिष्टमंडळ राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेत्रत्वाखाली आज राज्यपाल व ग्राम विकास मंत्री यांना
आंतरजिल्हा बदल्या व जिल्हांतर्गत बदल्यात होत आसलेल्या विलंबामुळे राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती निवेद्वाना द्वारे केली आहे.तसेच शिक्षकांच्या ईतरही मागण्यांचे निवेदन राज्यपालांना व वरील सर्व मान्यवरांना दिलेले आहे.

शिक्षक सहकार संघटनेचे राज्यपाल व ग्राम विकास मंत्री यांना साकडे,

ग्राम विकास विभागाणे 7 एप्रील 2021 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या आँनलाईन करण्याचे सुधारीत धोरण जाहीर केले आहे. परंतु बदल्याचे सॉफ्टवेअर तयार नसल्याचे कळविले आहे. तसेच शिक्षक सहकार संघटनेने ग्रामविकास मंत्री हसण मुश्रीफ व ग्रामविकास सचिवांची भेट घेतली व लवकरच आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा व अंतर्गत बदल्या आँनलाईन करण्या बाबतची विनंती केली. परंतु सध्या साँफ्टवेअर च तयार नसल्याने लवकर बदल्या होणार नसल्याचे त्यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगीतले. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या व जिल्हांतर्गत बदल्यात होत आसले ली विलंब पाहता मा. राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती संघटनेनी केली आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची विनंती

3 आँगस्टच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार शाळा सुरु झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबविण्याबाबत कळविलेले आहे.परंतु प्रत्यक्षात शाळा हि रोज चालु आसुन कोराना मुळे फक्त मुलांची उपस्थीती नाही. शासनाच्या निर्णयानुसार पन्नास टक्के उपस्थीत महाराष्ट्रातील जिल्हापरिषदेच्या शाळा सर्वत्र चालुच आहे. आशा परिस्थीत ग्रामविकास विभागाणे काढलेल पत्र अतिशय चुकिचे आसुन प्रत्यक्ष पन्नास टक्के उपस्थीत शाळा चालु आसताना शाळा बंद आहे व शाळा सुरु केल्यावर बदल्या करु हे म्हणन चुकिचे आहे. यामुळे महाराष्ट्रातील जिल्हापरिषद शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आसुन ग्रामविकास विभागाणे काढलेले ३ आँगस्टचे पत्रतात्काळ मागे घेण्याची विनंती केली आहे.
टप्पा एक चार मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत काहि जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेले नाही. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश द्यावेत, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करुन २००४ नंतर सेवेत आलेल्या व १जानेवारी २०१६ नंतर चटोपाध्याय वेतन श्रेणी लागु झालेल्या शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगात होत असलेला अन्याय दूर करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यपाल महोदयांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळात राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, नागपुर विभाग प्रमुख रविंद्र अंबुले , मुख्यसंघटक रवि ढगे, गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, लाखेश्वर लंजे, ईत्यादी उपस्थित हो

अमोल गिरी
लातूर जिल्हा प्रतिनिधी
एन टी व्हि न्युज मराठी लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *