जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन, (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दादा दानवे पाटील यांना निवेदन दिले)

घनसावंगी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आज सकाळी आठ वाजता केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दादा दानवे साहेब व एम डी कोलते व साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यात ऊसाच्या संदर्भात ना.दानवे साहेब यांच्या बंगल्यावर बैठक झाली. मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सुरुवातीपासून उसाच्या प्रश्नावर सहकार्य करून उसाच्या जास्तीत जास्त टोळ्या मिळाव्यात अशी विनंती केली.

तसेच घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ना.दानवे साहेबांनी कलेक्टर यांना आदेश देऊन सहकार्य करावे अशी मागणी हि यावेळी केली.

जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन आज *केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दादा दानवे पाटील यांना भेटुन निवेदन दिले.

तसेच घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जालना तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना भेटी….

पिकांची झालेली दैना,खरडून गेलेल्या जमिनी,घरांची पडझड, गुरांचे नुकसान हे सर्व पाहताना,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी आपण शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना धिर दिला. यावेळी ग्रामस्थ शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या या कठीण काळात शेतकऱ्यांनी धीर सोडू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *