फुलचंद भगत
वाशिम:-कर्तव्यदक्ष सी.ई.ओ.वैभव वाघमारे यांची बदली करण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी विविध सामाजीक संघटनासह पञकार बांधवांच्यावतीने जिल्हाधिकारी, वाशिम यांना तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यासोबतच सरपंचानीही सहभाग घेतला आणी ग्रामपंचायत सदस्य जयदिप परंडे यांनी सिईओ वाघमारे यांच्या पाठीशी असल्याचे निवेदन देत आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला.
जिल्हा परिषद वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वैभव वाघमारे हे रुजू झाले आणि अल्पावधीतच लोकाभिमूख आणि पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांवर छाप पाडली. मुळात वाशिम जिल्हा हा राज्यातील जिल्ह्यांच्या यादीत आकांक्षित असलेला जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथे आय ए एस दर्जाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अपवादानेच लाभले आहेत.
♦️आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभले आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार वैभव वाघमारे यांनी योग्य प्रकारे हाताळल्यामुळे गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अमुलाग्र बदल घडून आले आहेत.चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे ते कौतुक करत आहेत. तर कामचुकारांना वठणीवर आणत आहेत. त्यांच्या या कामगिरीवर जिल्ह्यातील समस्त जनता समाधानी असतांना काही कर्मचारी संघटनांनी वैभव वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली. यामुळे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी कशी काय होऊ शकते? हा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला.
♦️वाघमारे यांनी लोकप्रतिनीधींना विश्वासात घेवुन गावविकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे.जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी तसेच गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार विनिमय करून वाघमारे साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांची बदली होऊ नये. वैभव वाघमारे यांची कुठल्याही परिस्थितीत वाशिम येथुन बदली करू नये. जनभावनेचा आदर न करता त्यांची बदली केली गेल्यास सर्व जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशारा मंगरुळपीर तालुक्यातील ग्रा.पं.सदस्य जयदिप परंडे यांनी दिला आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206