पिकविम्यापासून एकही शेतकरी वंचित राहु नये.

(सचिन बिद्री :धाराशिव)

दिनांक 05 रोजी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय उमरगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
तालुक्यात होत असलेला सततचा व मागील 03 दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे व काही ठिकाणच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन तालुक्यात झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून सदर अहवाल 02 दिवसात तहसील कार्यालय येथे दाखल करणे व सदर पंचनामे करत असताना पिकांचे नुकसान झालेला एकही शेतकरी यापासुन वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी यांना यावेळी केल्या.


बैठकीस युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, तहसीलदार गोविंद येरमे, तालुका कृषी अधिकारी रितापुरे, विस्तार अधिकारी भांगे, विधानसभा संघटक शरद पवार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *