ऍड धीरज भैया पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. राणा पाटील यांच्यावर कारवाई करा
(सचिन बिद्री :धाराशिव)
पंचनामे न करता उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसरकट मदत करा आणि धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष ऍड धीरज भैया पाटील यांना तुळजापूर चे आमदार राणा पाटील यांनी खालच्या दर्जा ची भाषा वापरून टीका केली याबद्दल जाहीर माफी मागावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्यातर्फे उमरगा तहसीलदार यांना दि 8 रोजी निवेदन देण्यात आले आहे.
उमरगा लोहारा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पंचनामे न करता सरसकट शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली असून दुसऱ्या एका निवेदनाद्वारे आमदार राणा पाटील यांच्यावर कारवाई व त्यांनी जाहीर माफी मागावी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की तुळजापूरचे भाजपा आमदार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेली चार वर्षे कुठलेही विकासकामे न करता विकास कामांचा उद्घाटन करण्याचा देखावा सोशलमिडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करत आहेत असा आरोप निवेदनात करीत विकासकामाच्या नावाने खुप मोडा भ्रष्टचार करत आहेत व तुळजापूर तालुक्यातील जनतेला विकासाच्या नावाखाली गाजर दाखविण्याचे काम करत आहेत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष ऍड धिरज मैया पाटील व तुळजापूर तालुक्यातील जनता गेली असता राणा पाटील यांनी अॅड. धिरज भैया पाटील व तुळजापूर तालुक्यातील जनतेला (पत्रकारांना सांगीतले की, भुंकनाऱ्या कुत्र्यांची बाईट घ्या) खालच्या दर्जाचे शब्द वापरून दादागीरीची भाषा बोलत आहेत.असा उल्लेख उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी व त्यांनी माफि मागावी अन्यथा धाराशिव जिल्हा युवक कॉग्रेस व
जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल.असे म्हटले आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस चे सचिव विजय वाघमारे, सेवादल शहर अध्यक्ष बाबा मस्के,बलभीम अंबुलगे, अश्लेष भैया शिवाजीराव मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, ऍड इरफान जमादार, युवक तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड, युवक शहर अध्यक्ष सोहेल इनामदार, अप्पा कारभारी,प्रकाश चव्हाण ,अभिमन्यू भोसले,जीवन सरपे,प्रशांत सरपे,सिद्धार्थ सुरवसे,अभिमन्यू कांबळे,राहुल कांबळे, अमित रेड्डी आदी उपस्थित होते.