गंगापूर प्रतिनिधि
शहरातील समतानगर येथे विनायक उर्फ संजय शंकर वाघ (५० वर्ष), मुळगाव तारवाडी, ता. कोपरगाव यांनी पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

ही घटना सोमवार, २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. विनायक उर्फ संजय वाघ यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वाघ यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. के. थोरे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *