INDIA | दुचाकीस्वारांना टोल प्लाझावर थांबून टोल भरावा लागेल, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे की, दुचाकीस्वारांकडून टोल घेण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.