DHARASHIV | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे एक भव्य सोहळा उत्साहात पार पडला. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात हजारो समाजबांधव उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार सुनील कांबळे यांच्यावतीने युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. “समाजातील प्रत्येक युवकाने शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या समाजावर होत असलेले अन्याय धुडकावून लावण्यासाठी शिक्षण आणि एकजूट हीच खरी ताकद आहे,” असे आवाहन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आधुनिक लहुजी शक्ती सेनाच्या नगीना कांबळे, लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे, पोलीस निरीक्षक कांगणे साहेब यांच्यासह समाजातील अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष रामजी गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कचरू भाऊ सगट यांनी केले. या भव्य जयंती सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी हजारो मातंग समाजाचे युवक उपस्थित होते.

एनटीव्ही न्यूज मराठी

धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *