औरंगाबाद : निर्भीड वृतीने उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ झेप च्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय झेप साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी हे संमेलन २५ व २६ डिसेंबर ला डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे होणार आहे. अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनच्या कविसंमेलन अध्यक्षपदाच्या निवडी साठी मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती अध्यक्ष ए.बी.साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झेप कार्यालयात बैठक घेण्यात आली. पहिल्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.शिवाजी वाठोरे आणि नवव्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी केलेल्या सुचनेनुसार सदरील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ग्रामीण विद्रोही कवी दशरथ सुरडकर यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली.

त्या संबंधीचे पत्र झेप साहित्य चळवळीचे संस्थापक तथा झेप साहित्य संमेलनाचे संयोजक समीक्षक डी.एन.जाधव यांनी दशरथ सुरडकर यांना दिले आहे. यावेळी सिल्लोड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कविवर्य दशरथ सुरडकर यांचे ज्ञानपंख,बायको माझी शिकली शाळा,अज्ञानाचा बळी, सावत्र आई,नामाचा सत्या,आघात हे ग्रंथ प्रकाशित असून प्रेम,फुल कविता संग्रह आणि ” गाव माझं बिघडलं ” ही कांदबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे “सत्याचा सर्वनाश” या कांदबरीचे लिखाण सुरू आहे. सुरडकर यांनी आयला लोचा झाला रे,या मराठी चित्रपटात भूमिका केलेली असून आत्ता ते आगामी एन फिल्म निर्मित ” पालवी ” या मराठी चित्रपटात उत्कृष्ट कलाकार म्हणून ते व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच “मला शाळेत जायचं ना” या टेली मराठी चित्रपटात काळी टोपी घालून शिक्षकांंची अतिशय उत्कृष्ट भुमिका वठवली आहे. त्यांच्या साहित्याला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण समता गौरव पुरस्कार,औरंगाबाद येथील राज्यस्तरीय सूर्यपुत्र भैय्यासाहेब गौरव पुरस्कार यासह अनेक संस्थानी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. लोकपत्र, दैनिक मापदंड, दैनिक लोकसंकेत, दैनिक एकमत, महानायक, साप्ताहिक लोकशाहीचे मारेकरी, अशा अनेक वर्तमानपत्रात त्यांनी उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे. सध्या ते “आपले ज्ञानपंख” या वृत्तपत्राचे मुख्य संपादक असून साहित्य, कला, सामाजिक, राजकीय ,पत्रकारिता आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी भरीव उलेखनीय कार्य केले आहे आणि आज रोजी ते करीत आहेत.अशा या अष्टपैलू सर्वगुणसंपन्न असलेले विद्रोही कवी,साहित्यिक,लेखक,पत्रकार, संपादक दशरथ सुरडकर यांची अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, हे विशेष!

प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *