औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वी सोयगाव तालुक्यात व त्यानंतर सिल्लोड तालुक्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकासह एकाने एकूण१६ शेतकरी यांची ३६ लाखाची फसनुक केल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापुर्वी गुन्हा दाखल आहे.
त्यातील संबंधित ग्रामसेवकासह अन्य एकास अटक करण्यात आलेलो होती.दरम्यान या गुन्ह्यातील ग्रामसेवकाची माहिती जिल्हा परिषद औरंगाबाद प्रशासनाला माहिती असतांना देखील त्या ग्राममसेवकावर कारवाई न करता त्यास अभय दिले जात असल्याचे समोर येत आहे.
सविस्तर माहिती अशी की ,महेद्र सिताराम निकम गुन्हा घडला त्यावेळी संबंधित ग्रामसेवक हा ग्रामपंचायत बोरमाळ तांडा ता. सोयगाव येथे कार्यरत होता) येथे कार्यरत असतांना जारगाव ता. पाचोरा येथील रहिवासी आहे.हल्ली ग्रामसेवक म्हणून चारनेर ता. सिल्लोड येथे कार्यरत असून जारगाव येथूनच त्याने केलेली संपुर्ण नोकरीचा कालावधी अपडाऊन करण्यात घालवलेला आहे.
ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम याचा साथीदार अशोक रघुनाथ पाटील रा.निंभोरा ता.रावेर जि.जळगाव अर्थात ग्रामसेवक निकम यांचे जवळचे नातेवाईक असून

या दोघांनी मिळून सोळा शेतककऱ्यांच्या शेतातील कच्चा केळीचा माल खरेदीने उचलून घेतली.सुरवातीला काही वर्षांपुर्वी त्यांनी दोन तीन शेतकऱ्यांच्या सोबत केळी माल खरेदी-विक्रीचा व्यवहार केलेला होता.त्यानंतर सोळा शेतकऱ्यांनी महेंद्र निकम आणि अशोक पाटील सोबत खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता. त्यांनाही सुरुवातीला ह्या दोघे भामट्यांनी काही प्रमाणात पैसे दिले.ह्या दोघात मुख्य सुत्रधार ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम हाच दिसून येत होता असे सोळाही शेतकरी यांचे म्हणणे आहे.
हा खरेदीचा व्यवहार साधारण २०१९ वर्षाच्या सुरुवातीला दोन ते तीन महिन्यात घडलेला व्यवहार असून सोळाही शेतकऱ्यांची ठगीची रक्कम रुपये ३६,६३,०५८/-(छत्तीस लाख, त्रेसष्ट हजार ,अठावन्न ) ईतकी रक्कम आहे. मधली दोन वर्षे त्यांनी शेतकरी यांना पुढच्या महिन्यात देतो,पंधरा दिवसात देतोअसे आश्वासने देत चाल – ढकल करीत , वेळ मारुन नेतअसत.
शेवटी सर्वांनी मिळून त्यांचेकडून जळगाव सेशन कोर्टात वकीलामार्फत नोटरी करुन दिली.त्यात नमूद केले गेले की ०४ जुलै २०२१ रोजी ऊर्वरित पुर्ण रक्कम महेंद्र निकम आणि अशोक पाटील यांनी शेतकरींना देतील,वेळेत न दिल्यास फौजदारी व दिवाणी कार्यवाहीस ते बांधील राहतील.त्यांनी वेळेत पैसे परत तर केलेच नाही तर तुमच्याकडुन जे होईल ते करा मी पैसे देत नाही.अशी धमकी दिल्याने दिनांक -०४आॕगस्ट २०२१ रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अशोक रघुनाथ पाटील आणि महेंद्र सिताराम निकम या दोघांवर भारतीय दंड संहिता अन्वये कलम ४२० , ४०६ ,३४ प्रमाणे कारवाई करण्यात येऊन या दोघांना ही अटक करण्यात आलेली होती.
या घटनेची संपुर्ण माहितीचे निवेदनऔरंगाबाद जिल्हाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे शेतकरी असलेल्या डॉ किशोर सोनवणे यांनी दिनांक -१८/१०/२०२१ ला दिलेले आहे. मात्र औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कर्मचारी ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम याचेवर शिस्तभंगाची कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. वास्तविक शासकीय नोकर असून व्यापार करणे,व्यापारात फसवणुक करणे.गुन्हा दाखल झालेला असतांना शिस्तभंगाची कार्यवाही करुन निकम याचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करणे अपेक्षित आहे.मात्र अद्यापही औरंगाबाद जिल्हा परिषद प्रशासनास जाग न आल्याने २२/१२/२०२१ रोजी स्मरणपत्र १ ले हे पुनश्च देण्यात आलेले आहे.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे संबंधित शासकीय कर्मचारी महेंद्र निकम यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद