(सचिन बिद्री: उस्मानाबाद)
उस्मानाबाद : शेतीसाठी दररोज किमान 10 तास सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नौकारीत सामील करून घ्या अश्या मागणीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी दि 19 जानेवारी रोजी केली आहे.

उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील एक वर्षांपासून आम्हा शेतकऱ्यांना 48 तासांत केवळ आठ तास वीज पुरवठा होत आहे. आमचे पूर्ण अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे व शेती ही वीज पाणी आणि दर्जेदार बियाणे यावर अवलंबून असून अपुरे विजेमुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.सुरळीत किमान 10 तास ही वीजपुरवठा देण्यास होत नसेल तर आम्हा शेतकरी पुत्रांना शासकीय सेवेत सामील करून घेण्यात यावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर उमरगा तालुक्यातील नायचाकूर येथील प्रसाद सुधाकर पवार, प्रेमनाथ पवार, सुरज पवार, शुभम पवार, सत्यजित पवार, प्रदीप पवार, गणेश करनुरे, सिद्धेश्वर गरुड आदिसह एकूण 26 शेतकरी पुत्रांच्या स्वाक्षऱ्या आहेत.