प्रतिनिधी सचिन बिद्री:उमरगा
उस्मानाबाद : मुरूम मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२०२०-२०२१ चा पीक विमा मिळावे यासाठी गेले दोन दिवसांपासून समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांचे अन्नत्याग आंदोलन मुरूम येथील रितेश फार्म हाऊस येथे सूरु होते. दि. ३१ जानेवारी रोजी अन्नत्याग आंदोलनास सुरुवात झाले होते, दि.०१ रोजी संध्याकाळी सात वाजता बजाज कंपनीच्या वतीने आंदोलक श्री पुराणे यांना पत्र देण्यात आला, ज्यामध्ये १० फेब्रुवारी पर्यंत मुरूम मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले असे आंदोलक रामलिंग पुराणे यांनी माहिती दिली,
लेखी आश्वासनानंतर कृषी उपविभागीय अधिकारी उमेश बिराजदार यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण माघे घेण्यात आले यावेळी उमरगा तालुका कृषी अधिकारी श्री बिडबग,कृषी मंडळ अधिकारी अभिजित पटवारी, विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी तौसिफ, तालुका प्रतिनिधी कवी उमक आदी उपस्थित होते. सन २०१९ च्या पीक विम्यातुन मुरूम मंडळास वगळण्यात आले होते, ती फाईल पुन्हा ओपन करून शासनाकडे प्रस्ताव सादर करू असे आश्वासन कृषी उपविभागीय अधिकारी उमेश बिराजदार यांनी दिली व त्याच बरोबर २०२० पीक विमा विषय कोर्टात न्याय प्रविष्ट आहे. २०२१ च्या पीक विमा रक्कम मुरूम मंडळात ४,७१,०००००/- (चार करोड ७१ लाख) पैकी २,९१,०००००/- (दोन करोड एक्यानव लाख) रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून उर्वरित रक्कम पण वर्ग करण्यात येत आहे परंतु अद्याप ते ट्रान्झिट मध्ये असल्याने दि.१० फेब्रुवारी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असे लेखी आश्वासन बजाज फायनान्स स्टेट हेड अजिंक्य खिर्डीकर यांनी दिले आहे. ७२ तासाच्या नंतर ज्यांनी नुकसानी बाबत कळविले आहे त्यांचेही प्रस्ताव शासनास सादर करून तेही मंजूर करून घेण्याचे आश्वासन उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांनी दिली अशी सविस्तर माहिती आंदोलक रामलिंग पुराणे यांनी Ntv न्युज मराठीशी बोलताना सांगितले.
—//–
“आंदोलन तूर्तास जरी स्थगिती झाले असले तरी शेतकऱ्यांना जो पर्यंत न्याय मिळणारं नाही तोपर्यंत पाठपुरावा चालू राहील”–रामलिंग पुराणे
समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण