दुचाकी चारचाकी वाहन चालकांना करावी लागते कसरत

प्रशासन कधी लक्ष देणार,नागरिकांचा प्रश्न

लातूर : नांदेड-बिदर राज्य मार्गावर वायगाव पाटी ते शिरुर ताजबंद मार्गावर धुळीचे लोट उठत आहेत.वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी एखादे वाहन चालत असताना त्यांच्या मागे धुळीचे लोट मोठं मोठी निर्माण होत आहेत रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

अहमदपूर-शिरुर हाळी -मार्गे उदगीर जातो,या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी,जीप,टमटम,अवजड वाहन जातात सतत वाहनांची ये-जा संख्या भरपुर असते या मध्ये ऊसाच्या ट्रक्टर,अवजड वाहनांची भर पडली आहे.हाळी हंडरगुळी येथे पशुंचा बाजार प्रसिद्ध आहे. आठवडी बाजार भरतो पशुधन विक्री व खरेदीसाठी दुसऱ्या राज्यातुन व्यापारी येतात.हाळी हंडरगुळी येथे मध्यम तिरु प्रकल्प असल्याने परिसरातील ताजा भाजीपाला येथे मिळतो म्हणून आठवडी बाजार भरतो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनांची आजुबाजुच्या परिसरातील वाहनांची संख्या भरपुर असते.शिरुर ते वायगाव पाटी पंर्यत रस्त्यावर मोठी खड्डे पडले होते पण काही दिवसांपूर्वी ते खड्डे मुरुम भरुन खड्डे बुजवून टाकली मात्र आता धुळीमुळे दुचाकीला तर चांगलाच त्रास होतो.

वायगाव पाटी जवळ असलेल्या द्वारकानगर येथील वस्तीतील नागरिकांना धुळीचा लोट उठत असल्याने पुर्ण वस्तीत जात आहे.घरावर धुळ उडून साचत आहे.रोड दुरुस्ती कधी होणार यावर चर्चा चालू आहे.तरी सा.बा.विभाग याकडे लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *