आता तरी याकडे वनविभाग लक्ष देणार का?
चंद्रपूर : जंगलामध्ये अवैधरित्या बांबू ची कटाई करून ताटवे बनवून दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालू असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूचे जंगल असल्यामुळे त्याच्यापासून निर्मिती होणाऱ्या वस्तूची बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे, याचाच गैरफायदा घेऊन या क्षेत्रात अवैद्य रित्या जंगलात मजूर लावून काही ठेकेदार बांबूचे ताटवे बनविण्याचा धंदा चालू केले असून ते ताटवे यवतमाळ, नांदेड, अकोला येथे पाठविण्यात येते. आणि त्याचा चांगला मोबदला या ठेकेदारांना मिळत असतो. मजुरा द्वारे जंगल परिसरातच अवैध्य रित्या बांबूची कटाई करून ताटवे बनवल्या जाते. हा गोरख धंदा अनेक वर्षांपासून चालू आहे. जिल्ह्यातील केळझर, डोणी, हळदी, जुनोना, गिलबिली, बोर्डा, मामला, फुलझरी या क्षेत्रात वन विभागाने लक्ष देऊन अशा अवैद्य काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.