उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कदेर येथील 15 तारखेला होणारा नियोजित बालविवाह रोखून जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने आणि प्रशासनाने मोठं यश मिळवलं आहे तर धाडसी “रेश्मा” च्या आर्थिक बिकट परिस्थिती पाहता तिच्या पदवीपर्यंत शिक्षणासाठी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले यावर रेश्मा ला मोठा शैक्षणिक आधार भेटला असून तिच्या आई वडिलांत आपल्या मुलीबद्दल आदर निर्माण झाला.

दि 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या दरम्यान उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला बालकल्याण विभागाच्या समुपदेशक राऊ भोसले यांना कदेर गावातून रेश्मा ने फोन करून आपल्या आई वडिलांनी एका छोट्या कार्यक्रमात लग्न लावून देणार असल्याबाबत माहिती दिली.राऊ भोसले यांनी लागलीच जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना कळविले त्यावर सचिन बिद्री यांनी लागलीच आलेल्या नंबर वर फोन करून अधिक माहिती घेतली,तोपर्यंत “तू फोन करून का सांगितले” म्हणून रेश्मा च्या वडिलांनी रेश्मा ला मारहाण केल्याबाबत रेश्मा ने सचिन बिद्री यांना सांगितले यावर श्री बिद्री यांनी रेश्मा च्या धाडसी निर्णय बाबत कौतुक करीत तिला आधार दिला व प्रेरित केले तर वडिलांची कानउघडणी करीत मुलीच्या शिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत समुपदेशन केले आणि संबंधित प्रकार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, महिला बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश, तहसीलदार राहुल पाटील व प्रभारी पो नी कवडे यांना सांगितले.
उद्याच्या तारखेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी दिवेगावकर आणि उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सात वाजता ‘पथक’ कदेर गाव गाठले.काही क्षणातच सरपंच सतीश जाधव, उपसरपंच राणी राठोड, ग्रामसेवक व्ही बी राजपूत,बिट अंमलदार एन बी वाघमारे,मंडळ अधिकारी जेवळीकर,तलाठी एम एम अंबर, पोलीस पाटील सुनील पाटील आदी ग्रामपंचायत गाठले,यावेळी बालविवाह बाबत जनजागृतीस सुरुवात झाली,ग्रा.पं. सदस्य मीनाक्षी जाधव, इंद्रजित जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले. रेश्मा आणि तिच्या आई-वडिलांसह समस्त ग्रामस्थांमध्ये मुलीचे महत्व, कायद्याच्या तरतुदी, राज्यघटनेतील मूलभूत हक्क याबाबत सविस्तर माहिती देत तत्कालीन महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, तत्कालीन उपविभागीय पोलीस महिला अधिकारी अनुराधा उदमले यांची उदाहरणे देत मुलगी शिकली तर काय करू शकते..? यावर श्री बिद्री यांनी मार्गदर्शन केले यावेळी सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून सजग प्रशासन व समितीच्या चळवळीचे कौतुक केले.

रेश्माचा ‘भीक’ मागून खाण्यास विरोध

रेश्मा ची आई घरकाम/मजुरी करते तर वडील बैलाचा व्यापार/भेटेल ते काम करतात असे समजले तर आपल्या मुलीला (रेश्मा) ला गावात मागून आणायला (भीक) आणायला पाठवायचे असे ग्रामस्थांनी सांगितले,दरम्यान रेश्मा ११ वीत असल्याने शिक्षणाची आवड व तिच्यात स्वाभिमान निर्माण झालेले दिसून आले तिने स्वतःहून भीक मागून खाण्यास आपल्या वडिलांना नकार देत शिक्षण घेण्याची इच्छा दर्शवली तिच्या कौटुंबिक आर्थिक बिकट परिस्थिती असल्याचे समजताच जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुलीन अंकुशे यांनी धाडसी रेश्मा च्या पदवी पर्यंत शिक्षणाची शैक्षणिक पालकत्व स्वीकारले यामुळे रेश्मा व तिचे आई वडील अत्यंत भावुक झालेले दिसून आले.

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

बालविवाह रोखणे, कायद्याची अंमलबजावणी करणे हे कार्य प्रशासन व बालविवाह प्रतिबंध समितीतर्फे घडत आहे पण एखादा बालविवाह का होत आहे.?कारण शोधून त्यावर तत्परतेने उपाय काढणारे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुनिल अंकुश यांच्या या रेश्मा नामक धाडसी मुलीचे शैक्षणीक पालकत्व स्वीकारून तिला आधार देण्याचे सामाजिक कार्य एका अधिकार्यातर्फे निर्णय झाला यामुळे कदेर ग्रामस्थ व परिसरातून कौतुक होत आहे.

मी बालविवाह करणार नाही,मला उच्च शिक्षित व्हायचे

”उद्याच्या तारखेत पाहुणे येणार, बालविवाह होणार” याबाबत रेश्माला आपल्या आईवडिलांकडून चाहूल लागताच, रेश्मा ने वडिलांच्याच मोबाईल वरून साधला बालविवाह प्रतिबंध पथकाला संपर्क.तिचा हा धाडसी फोन कॉल ठरला तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट..!

(आयुब शेख : उस्मानाबाद)

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *