वाशिम : येथील अॅड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हया कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणुन अॅड दिपाली सांबर हया होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुशांत चिमणे होते.प्रमुख मार्गदर्शिका अॅड दिपाली सांबर यांनी आपल्या भाषणामध्ये “येणा-या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता’ हया विषयावर आपले विचार मांडतानां स्त्री पुरुषांनी मिळुन एकत्रकाम करणे म्हणजेच शाश्वत विकास आहे असे प्रतिपादन केले.त्याच बरोबर माहिलांच्या समाजातील सद्याच्या परिस्थीतीवर प्रकाश टाकला.


हया कार्यक्रमामध्ये अॅड सज्जनसिंग चंदेल तसेच डॉ प्रियंका चौधरी हयांनी देखील संविधानाने महिलेला दिलेले अधिकार हया विषयावर मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ सुशांत चिमणे हयांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या जिवनात स्त्रीला अनन्य साधारण असे महत्व आहे कारण स्त्री ही जीवनात अनेक भुमिका साकारत असते म्हणजेच आई,बहिण,पत्नी,मुलगी अशा विविध स्वरुपात ती पुरुषाच्या मागे उभीराहुन सहकार्य करीत असते तसेच महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हया दृष्टीकोनातुन महिला दिन साजरा करणे हया गोष्टीला महत्व आलेले आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रम दरम्यान रामदास जाधव,आचल आठवले, मयुरी लोखंडे,समाधान सानप,कविता मांगुळकर,सुशिल भिमजियानी,हर्षल बोबडे,सेवेद्र सोनुने हया विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन
प्रा.भाग्यश्री धुमाळे व संचालन रोशनी चोपडे यांनी केले तर आभार स्वाती देशमुख हयांनी व्यक्त केले. हया कार्यक्रमाला प्रा.ललिता दाभाडे,डॉ सागर सोनी,ग्रंथपाल संजय ईढोळे ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्याने ऊपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *