लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील 33/11 के.व्ही.येथुन विजेचा लपंडाव चालु आहे, विज सर्व नागरिकांची आजच्या काळात गरज बनली आहे विज काही दिवसांपासून लोडमुळे विज टिकत नाही शेतकरी, नागरिक, लहान उद्योग व ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा यावर परीणाम होत आहे.अगोदरच कोव्हीड मुळे नागरिक अडचणीत सापडलेला आहे, त्यांमध्ये शेतातील विहीर,बोअर मध्ये पाणी असुन विजेच्या लपंडावामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
हंडरगुळी येथे प्रसिद्ध आठवडी बाजार भरतो हाळी हंडरगुळी गावांमध्ये नागरिकांची वर्दळ नेहमी असते तसेच मध्यम तिरु प्रकल्प असल्याने जमिनीत पाणीसाठा हा बोअर, विहीरसाठी भरपुर असतो परिसरातील ताजा भाजीपाला मिळतो शेतकरी इतर पिकांनाही पाणी देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. हंडरगुळी येथे 33/11के.व्ही.असुन एकुण 6 फिडर आहेत, स्टाफ 14,गावे 33आहेत तसेच 4ऑपरेटर मात्र वाढवणा फिडरवर लोड जास्त आहे 5 एम.व्ही.म्हणजे मेगाव्होल्ट ॲम्पीअर असुन लोड घेत नाही.गावठाण वेगळे व शेतीसाठी वेगळे होणं गरजेच आहे सिंगल फेसच्या डिपो काढुण थ्रीफेस टाकणे गरजेचे आहे.

आर.डी.एस.एस.स्किम अंतर्गत प्रस्ताव मंडळ कार्यालय लातूर येथे दाखल करण्यात आला त्यामध्ये थ्रीफेस डेपो, हंडरगुळी येथील 33/11के.व्ही.साठी 5 एम.व्ही.ए.ठिकाणी 10 एम.व्ही.ए.चे पावर ट्रान्सफॉर्मर वाढवणे सर्व प्रस्तावात मागणी केलेली आहे मात्र तिन महिन्यांपासून प्रलंबित आहे. विज पुरवठा सारखा खंडीत होतो विजबिल भरपुर येते तेही वेळेवर भरावं लागतं,तर मागणी केलेला प्रस्ताव कधी मंजूर होईल व शेतकरी व नागरीकांची होत असलेली गैरसोय कधी दुर होणार याकडे शेतकरी व नागरीक लक्ष देऊन आहेत. सहायक अभियंता एन.एम.चामटे-आर.डि.एस.एस.स्किम.अंतर्गत तिन महिने झाले मंडळ कार्यालय लातूर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.गावठाण व शेती वेगळी करणे महत्त्वाचे.
लक्ष्मीकांत मोरे
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
एन.टिव्ही.न्युज मराठी