लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे दि.13मार्च रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले.

हंडरगुळी येथील रहिवासी बाळासाहेब चंद्रशेखर धुप्पे व माधव चंद्रशेखर धुप्पे सर्वे नंबर 57 मधील यांचा साडेतिन एकर ऊस दुपारी अचानक लागलेल्या आगीत जळाला ऊसासोबत बाजुला असलेली झाडे जळाली 5 लाख रुपये नुकसान झाले आहे.काल 14 मार्च रोजी तलाठी सज्जा हंडरगुळी यांच्या कडून पंचनामा करण्यात आला. ऊन,वारा, पाऊस,रात्र एक करून वर्षभर केलेले कष्ट पुर्ण वाया गेले हाती आलेला ऊस जळुन गेला तरी शासनाच्या दरबारात या शेतक-यांना मदत मिळावी ऐवढी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली.
लक्ष्मीकांत मोरे
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातूर
एन.टिव्ही.न्युज मराठी
मो.नं.9130553997
9022493491