वाशिम: ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधत मंगरुळपीर तहसिलच्या सभागृहामध्ये तहसिलदार शितल बंडगर,ता.पुरवठा निरीक्षण अधिकारी रुपाली सोळंके यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत ऊत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.


भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला आहे.असे मत मंगरुळपीर येथील तहसिलच्या सभागृहामध्ये आयोजीत जागतिक ग्राहक दिनाच्या औचित्याने मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार शितल बंडगर तर प्रमुख मार्गदर्शीका म्हणून पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके,माजी नगराध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर आणी इतर मान्यवर होते.तर निवासी नायब तहसिलदार रवि राठोड, रुपाली सोळंके,पुरवठा निरिक्षक सिमा दोंदल, यांच्यासह प्रमुख अतिथी महाराष्ट ग्राहक परिषद मुंबई महाराष्टचे अशासकिय सदस्य प्राध्यापक सुधिर घोडचर,ग्राहक मंचाच्या वनमाला पेंढारकर,पञकार सुधाकर चौधरी,फुलचंद भगत,शिवाजी गजभार,अशोक राऊत,नितीन विटकरे,लईक अहेमद यांचेसह महसुल कर्मचारी,सेतु सुविधा केंद्राचे संचालक,डिलर,दुकानदार तसेच विविध दुकानदार यांचेसह ग्राहकांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.८४५९२७३२०६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *