होळीला पाण्याची नासाडी न करता जोपासला पर्यावरण संवर्धनाचा वारसा


वाशिम : होळीला अनाठायी पाण्याची नासाडी करुन पर्यावरणाला हानी पोहचवणारे बरेच दिसतात परंतु मंगरुळपीर येथील यंग सिटिझन टिमने होळीच्या पर्वावर मंगरुळपीर येथील महात्मा ज्योतीबा फुले ऊद्यानातील झाडांना पाणी देवुन पर्यावरण संवर्धनाचा वारसा जोपासल्याचे प्रेरणादायी ऊदाहरण जनमाणसापुढे ठेवले आहे.

सामाजीक कार्यातुन आपल्या कतृत्वाचा ठसा ऊमटवणार्‍या यंग सिटिझन टिमने होळीला धूमाकुळ न करता,कुठलीही पाण्याची नासाठी न करता,पर्यावरणाची हानी न पोहचवता ऊलट पर्यावरण अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

महात्मा फुले ऊद्यानात सामाजीक कार्यकर्त्यांनी लावलेली झाले या तप्त ऊन्हामुळे पाण्याअभावी सुकत चालली होती.या झाडांना वाचवण्यासाठी टिमने पुढाकार घेत स्वखर्चाने टॅंकर बोलावून सर्व झाडांना पाणी देवून झाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला.प्रशासनानेही या ऊद्यानाकडे लक्ष देवून झाडे जगतील यासाठी ऊपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी यंग सिटिझन टिमने केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *