यवतमाळ : उमरखेड तालुक्यांमध्ये 2021 मध्ये नापिकी व कर्जबाजारी मुळे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून महसूल प्रशासनामार्फत तहसील कार्यालय उमरखेड येथे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना धनादेश वाटप करण्यात आले

मालताबाई कांबळे रा मोहदरी, प्रयागबाई रणमले रा कोर्टा, ललिता प्रेम जाधव रा निंगणुर, सीताबाई प्रकाश चव्हाण रा इसापूर, तृप्ती पुरी रा पोफाळी, प्रियंका गजानन बिट्टेवार रा ब्राह्मणगाव, या शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. जगातील सर्वात मोठा दुःख कोणता असेल तर ते आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांचे दुःख आहे अशा सर्वच कुटुंबांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संघटना समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर यायला हवं असे विचार तहसीलदार आनंदी देऊळगावकर यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी नायब तहसीलदार काशिनाथ बी डांगे ,उपाध्यक्ष भूमिअभिलेख बळवंत मस्के, तिडके व सर्व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *