यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील चातारी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर प्रेरित होऊन पक्षाचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांची सेवा करण्यासाठी शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला त्या नंतर अनिल माने यांची प्रहार शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदि पक्ष श्रेष्ठींनी निवड केले.


त्यांनी आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांची निवड प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भाऊ देशमुख यांनी नुकतीच केली आहे. अनिल माने यांनी मागील सात वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिताचे कामे वेळोवेळी बांधावर उतरून केले असून त्यांच्या या कामाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बिपीन चौधरी यांनी अनिल माने यांच्या जिल्हा अध्यक्ष पदाची शिफारस प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश देशमुख यांना केली होती. बिपीन चौधरी यांनी केलेल्या शिफारशीवरून प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश देशमुख यांनी अनिल माने यांची प्रहार शेतकरी संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *