लातुर : म.ए.सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त उदगीर येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी होत असून याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनाही घेता यावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक खेड्यापाड्यात जाऊन निमंत्रण पत्रिका देत आहेत.

शिवाय नागरिकांना संमेलनाविषयी माहीती सांगत आहेत. २२, २३ व २४ एप्रिल रोजी उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परिसरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.५०,००० हजार पेक्षा जास्त साहित्य प्रेमिची भेट, भव्य ग्रंथ दिंडी, सतत ३दिवस साहित्य रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी मागील काही दिवसांपासून उदगीरात संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. आता शहरानंतर तालुक्यासह जिल्ह्यात उदगीर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक गावोगावी जाऊन शाळा, ग्रामपंचायती, सेवाभावी संस्था यांना निमंत्रण पत्रिका देत आहेत.

गुरुवारी हाळी हंडरगुळी येथे प्रा.डाॅ. बी.एस.कांबळे व त्यांच्या विद्यार्थी टीमने गावात येऊन संमेलनाविषयी नागरिकांना माहीती दिली. शासकीय, निमशासकीय कार्यालयांना निमंत्रण पत्रिका दिल्या. या संमेलनात साहित्य प्रेमींची भेट, भव्य ग्रंथदिंडी, शेतकऱ्यांचे चित्रण, कथाकथन, गझलकट्टा, पुस्तक प्रकाशन कट्टा यापेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
लक्ष्मीकांत मोरे उदगीर
जळकोट प्रतिनिधी लातुर