पालघर : जिल्ह्याची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू असून काही दिवसांत च पूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल अणि याचे सर्वस्वी श्रेय जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे आहे.तसेच कोरोना महामारीच्या काळात सर्व आरोग्य जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कार्यरत होती अनेकांना यात आपला जीव ही गमवावा लागला. या काळातील आशा भगिनींचे मोलाचे योगदान आहे.आजही आशा किंवा आरोग्य विभागाचे हे काम थांबलेले नाही.परंतु अथक प्रयत्नातून जिल्हा कोरोना मुक्ती कडे वाटचाल करतो आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.त्यासाठी आरोग्य समिती सभापती या नात्याने मी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण पूर्ण बरे होण्याचे प्रमाण १००.५ टक्के आहे.सम्पूर्ण जिल्हाभरात ०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर बाधीत रुग्णांचा दर ८ टक्के आहे, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात ७० टक्कयाहून अधिक बधितांचे प्रमाण कमी झाले आहे, तर गेल्या आठ दिवसात एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, विशेष म्हणजे आरोग्य विभागाने यावेळी बाधित रुग्णाच्या बाबत रीकन्सलेशसन केल्यामुळं जिल्ह्यातील करोना बाबतची अचूक व कमी जास्त रुग्ण संख्या समोर आली आहे, त्यामुळे मार्च अखेर पर्यंत करोना मुक्तीकडे जिल्हा जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे,पालघर जिल्ह्यात आठवडा भरात केवळ १ करोना बाधित रुग्ण आढळून आला आहे, तर करोनाची देशात लागण सुरू झाल्यापासून आत्ता पर्यंत १६ लाख ०२ हजार ५५५ चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये १ लाख ५८ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १ लाख ५५ हजार २९५ रुग्ण आत्तापर्यंत पूर्ण बरे झाले आहेत बरे झाल्याच हे प्रमाण ९७. ९१ टक्के आहे तर ३ हजार३०४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे मृत्यूचा हा दर २.०८ टक्के असून ०७ रुग्ण सध्या ॲक्टिव आहेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा दर ९.९० टक्के आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज १ रुग्ण आढळून येत आहेत तर ४ लाख ९६ हजार ९६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये ६१ हजार २६७रुग्ण बाधीत आढळून आले आहेत, त्यातील ६० हजार ०३७ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागतील १हजार २२५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे सध्या ५ करोना बाधित रुग्ण जिल्ह्यात असून बाधित रुग्णांचा दर १२.३३ टक्के तर मृत्यूचा दर २.०० टक्के आहे आणि रुग्णा पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण ९७.९९ टक्के आहे,

महानगरपालिका क्षेत्रात मृत्यू २ हजार ०७९ इतके झाले आहेत तर सध्या ०२ ऍक्टिव्ह रुग्ण असून बाधित रुग्णांच्या दर ८.८ टक्का आहे तर मृताचे प्रमाण २.१ टक्का आहे व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के आहे.अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *