निमलगुडम येथे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन
गडचिरोली : ग्रामीश्रूण भागातील युवकांनी खेळामध्ये सातत्य ठेवावे.युवक या देशाचे आधारस्तंभ असून युवकांनी खेळासोबत सामाजिक कार्य जोपासावी व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना द्यावी आणि आपल्या कौशल्याचे बळावर क्रीडा क्षेत्रात आपलं व जिल्ह्याचे नावलौकिक करावी असे प्रतिपादन प्रदेश सदस्य तथा आदिवासी आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदिप कोरेत यांनी केले.
अहेरी तालुक्यातील निमलगुडम येथे स्व.सुनील सोयाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ युथ स्पोर्टिंग क्लब च्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटनप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिमरम ग्रा.प चे उपसरपंच प्रफुल्ल नागुलवार होते.प्रमुख अतिथी म्हणून राजाराम चे वनपाल ए.बि.राखडे, वनरक्षक बि.एम.पानेम, सदस्य जयश्री आत्राम, श्रीकांत पेंदाम, नागेश शिरलावार,घननिळा ओंनपाकला,विहिप जिल्हामंत्री अमित बेझलवार,आनंदराव कोडापे,साईनाथ मडावी, मुत्ताजी पोरतेट, शिक्षिका एन.एम.पातावार,माधव बामनकर, पेसा अध्यक्ष बंडू सिडाम,अविनाश पातावार,राकेश सोयाम,सोमबाई तलांडी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरेत म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांमध्ये मुळातूनच कला, कौशल्य असतात त्या कलेला या स्पर्धेच्या माध्यमातून विकसित करण्यास संधी प्राप्त होते व युवकांना एक व्यासपीठ तयार होऊन उत्कृष्ठ खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळते तरच आपल्या गावाचं व जिल्ह्याचे नावलौकिक होत असतो आणि आपल्यामध्ये राष्ट्रहित विचारांचे गुण विकसित होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.या प्रसंगी उपसरपंच प्रफुल्ल नागुलवार यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप मेश्राम तर आभारप्रदर्शन करण मडावी मानले.कार्यक्रम यशस्वीकरिता मंडळाचे शिवा कोडापे, विजय मडावी, प्रशांत बामनकर, संदिप मेश्राम, आनंदराव आत्राम, निलेश नाईनवार,अक्षय सडमेक,नरेश शिरलावार,अजय पेंदाम,प्रफुल्ल पेंदाम, प्रशांत सडमेक, आदी युवक सहकार्य केले.